Wardha Accident : वर्ध्यात ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार


वर्धा : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची (Wardha Accident) बातमी समोर आली आहे. नागपूर मुंबई महामार्गावर (Nagpur Mumbai Highway) एका ट्रकने रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरुन रिक्षाचालकासह सात जणांना घेऊन रिक्षा पुलगावकडे जात होती. आठवडी बाजारात खरेदीसाठी हे सर्वजण निघाले होते. यावेळी केळापूर शिवारात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर दुर्गाबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला. भीमराव पाटील व सुनीता कौराती यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.


याबाबतची माहिती मिळताच केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असलेल्या तिघांची जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या