Wardha Accident : वर्ध्यात ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार


वर्धा : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची (Wardha Accident) बातमी समोर आली आहे. नागपूर मुंबई महामार्गावर (Nagpur Mumbai Highway) एका ट्रकने रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरुन रिक्षाचालकासह सात जणांना घेऊन रिक्षा पुलगावकडे जात होती. आठवडी बाजारात खरेदीसाठी हे सर्वजण निघाले होते. यावेळी केळापूर शिवारात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर दुर्गाबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला. भीमराव पाटील व सुनीता कौराती यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.


याबाबतची माहिती मिळताच केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असलेल्या तिघांची जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष