मुंबई: जर काहीही खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास , दर अर्ध्या तासाला उलटी-जुलाब, जेवण न पचणे, डोकेदुखी, अधिक थकवा असे वाटत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.
फूड पॉईझनिंग एक प्रकारचे इन्फेक्शन असते जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस पसरू शकते. जेव्हा बॅक्टेरिया अथवा फंगसने संक्रमण झालेले पदार्थ कोणी खात असेल तर हे बॅक्टेरिया पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मारतात. यामुळे पचनक्रिया बिघडते. खराब पाणी, एक्सपायर झालेले पॅकेज्ड फूड, बराच वेळ बनवून ठेवलेले खाणे खाल्ल्याने त्रास होतो.
३२ ते ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाल्यास बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की ३७ डिग्रीपेक्षा अधिक तापमान बॅक्टेरिया आणि फंगससाठी अनुकूल असते.
याचकारणामुळे अधिक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत जेवण लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ताजे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्य तज्ञांच्या मते जर काहीही खाल्ल्यानंतर पोटात खूप दुखत असेल, दर अर्ध्या तासाला उलटी तसेच जुलाब होत असतील, डोकेदुखी, अधिक थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.
जर काहीही खराब खाल्ल्याने उलटी-जुलाबसोबत ताप, सतत उलटी होणे, उलटीद्वारे शरीरातील पाणी कमी होणे, तोंड सुकत राहणे, शरीरावर रॅशेस येणे अशा प्रकारच्या समस्या तीन दिवसांपेक्षा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.