Paris Olympics 2024: पंतप्रधान मोदींनी मनूशी फोनवर केली बातचीत, पॅरिस ऑलिम्पिक मेडल जिंकण्यावर केले अभिनंदन


मुंबई: रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. तिने हे कांस्यपदक १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जिंकले. या पद्धतीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले.




दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरशी फोनवर बातचीत केले. तिचे खूप अभिनंदन केले. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या समस्या दूर सारत तिने यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले.




पंतप्रधान मोदी फोनवर म्हणाले, खूप-खूप अभिनंदन. तुझ्या विजयाची बातमी ऐकून खूप उत्साह आणि आनंद झाला आहे. ०.१ ने रौप्य पदक राहिले. मात्र तरीही तू देशाचे नाव रोशन केलेस. तुम्हाला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. एकतर तुम्ही कांस्यपदक जिंकले आणि भारताच्या पहिल्या महिला जिने नेमबाजीत पदक मिळवलेले आहे. माझ्याकडून शुभेच्छा.




टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या कमतरता भरून काढल्या. मला विश्वास आहे की पुढेही तुम्ही चांगले कराल. सुरूवात चांगली आहे यामुळे उत्साह नक्कीच वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. यामुळे देशालाही लाभ होईल. बाकी सर्व साथीदार खूश आणि आनंदी आहेत ना? तसेच खेळाडूंना योग्य सोयी-सुविधा मिळत असल्याबद्दलही त्यांनी मनू भाकरला विचारले.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि