Paris Olympics 2024: पंतप्रधान मोदींनी मनूशी फोनवर केली बातचीत, पॅरिस ऑलिम्पिक मेडल जिंकण्यावर केले अभिनंदन

Share
मुंबई: रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. तिने हे कांस्यपदक १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जिंकले. या पद्धतीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरशी फोनवर बातचीत केले. तिचे खूप अभिनंदन केले. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या समस्या दूर सारत तिने यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी फोनवर म्हणाले, खूप-खूप अभिनंदन. तुझ्या विजयाची बातमी ऐकून खूप उत्साह आणि आनंद झाला आहे. ०.१ ने रौप्य पदक राहिले. मात्र तरीही तू देशाचे नाव रोशन केलेस. तुम्हाला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. एकतर तुम्ही कांस्यपदक जिंकले आणि भारताच्या पहिल्या महिला जिने नेमबाजीत पदक मिळवलेले आहे. माझ्याकडून शुभेच्छा.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या कमतरता भरून काढल्या. मला विश्वास आहे की पुढेही तुम्ही चांगले कराल. सुरूवात चांगली आहे यामुळे उत्साह नक्कीच वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. यामुळे देशालाही लाभ होईल. बाकी सर्व साथीदार खूश आणि आनंदी आहेत ना? तसेच खेळाडूंना योग्य सोयी-सुविधा मिळत असल्याबद्दलही त्यांनी मनू भाकरला विचारले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

5 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago