Narendra Modi : दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत!

कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा इशारा


कारगिल : भारताने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात (Kargil war) विजय मिळवला होता, या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu And Kashmir) द्रास येथे कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. त्यांनी देशवासियांशी संवाद साधला, तसेच पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.


जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याला पाच वर्षे पूर्ण होऊनही इथल्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. सातत्याने इथे अनेकदा दहशतवादी हल्ले होत असल्याने अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होतात. दिवस, महिने, वर्षे ,शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात".


"हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो. मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं”, असंही ते म्हणाले.



पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल


भारताने २५ वर्षांपूर्वी कारगिल युद्ध केवळ जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं दर्शन घडवलं आहे. तुम्हाला माहिती आहे की भारत तेव्हा शांततेसाठी प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. परंतु, सत्याच्या समोर असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढे दुप्रयास केले त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. भूतकाळातील सर्व नापाक प्रयत्नांमध्ये पाकिस्तान अयशस्वी ठरला होता, पण आता दहशतवाद आणि प्रॉक्सी अर्थात तिसऱ्याच्या मदतीने भारताविरुद्ध कारस्थानं करण्याचा प्रयत्न करत आहे.


पाकिस्तान आपल्या इतिहासातून काहीही शिकलेला नाही. आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवादाचे सूत्रधार थेट माझा आवाज ऐकू शकतील. मला दहशतवादाच्या या समर्थकांना सांगायचे आहे की, नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे सैनिक दहशतवादाला चिरडून टाकतील. पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.


Comments
Add Comment

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

West Bengal Next Deputy CM : पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! भाजप देणार दोन उपमुख्यमंत्री ? शुभेंदू अधिकारींकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या

Mumbai-Bengaluru Superfast Train : प्रवाशांची प्रतीक्षा संपली! मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेनला हिरवा कंदील; लवकरच 'वंदे भारत स्लीपर'चीही शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी बुधवारी प्रवाशांना एक मोठी

Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना

Johny Johny Yes Papa Controversy : ‘जॉनी जॉनी येस पापा’ मुलांना खोटं बोलायला शिकवते? उत्तर प्रदेशच्या शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य चर्चेत

उत्तर प्रदेश : बालपणी सर्व मुलांना शिकवली जाणारी इंग्रजी कविता म्हटलं की अनेकांच्या ओठांवर सहज येतं ते नाव

Kerala Congress Headquarters : पुरुष आमदाराकडून महिला आमदाराला बळजबरीने मिठी मारण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर संताप

- केरळ काँग्रेस मुख्यालयातील धक्कादायक घटना केरळ : केरळ काँग्रेस मुख्यालयाच्या (Kerala Pradesh Congress Committee) तिरुवनंतपुरम