मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणात काही चुका करू नयेत त्याचे नुकसान आयुष्यभर सहन करावे लागते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या चुका करतात त्यांना नेहमी आर्थिक तंगी जाणवते. कोणते ना कोणते संकट राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने तरूणपणी आपल्या वेळेची कदर केली पाहिजे. वेळ उगाचच वाया घालवू नये. जी व्यक्ती आपली वेळ वाया घालवते त्या व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. नेहमीच त्यांना तंगी जाणवते.
आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्ती तरूणपणी पैशाचे महत्त्व समजले पाहिजे. ज्या व्यक्तीला पैशाचे महत्त्व समजत नाही अथवा ते व्यर्थ खर्ची करतात. त्यांच्या खिशात कधीच पैसा टिकत नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आळसापासून लांब राहिले पाहिजे. आळशी व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तरूणपणात क्रोध नेहमीच आपल्यावर चढ असतो. तो सांभाळणारी व्यक्तीच यशस्वी होऊ शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणी कधीही चुकीची संगत धरू नये. अशा व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.