Rahul Dravid: टीम इंडियानंतर आता राहुल द्रविड बनू शकतात या संघाचे प्रशिक्षक

  51

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(rahul dravid) यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप विजयानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. टीम इंडियासोबत राहुल द्रविडचा करार या स्पर्धेपर्यंत होता. आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवानंतर त्यांचा करार बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपर्यंत वाढवला होता. या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाला अलविदा म्हटले.


आता ते इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रेंचायजी टीम राजस्थान रॉयल्ससोबत ते काम करू शकतात. २००८मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये राजस्थानने विजय मिळवला होता.


राहुल द्रविड हे प्रशिक्षकपदापासून दूर झाल्यानंतर आता त्यांचा पुढील प्रोजेक्ट काय असणार आहे याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. मिडिया रिपोर्टनुसार इंडियन प्रीमियर लीगमध्ये राहुल द्रविडचे कोच म्हणून पुन्हा पुनरागमन होऊ शकते. आपल्या जुन्या संघासोबत ते पुन्हा जोडले जाऊ शकतात. या संघाकडून खेळलेल्या राहुल द्रविड यांनी कर्णधार म्हणून दीर्घकाळ या फ्रेंचायझीला आपली सेवा दिली आहे. दरम्यान, रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे राजस्थानच्या संघाशी बातचीत सुरू आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.



राजस्थानसोबत राहुलचे करिअर


५१ वर्षीय राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत कर्णधार म्हणून खेळी केली आहे. त्यांनी २०१३मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० फायनलमध्ये पोहोचवले होते. द्रविडच्या नेतृत्वात खेळताना राजस्थानचा संघ प्लेऑफमध्येही खेळला होता.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र