Rahul Dravid: टीम इंडियानंतर आता राहुल द्रविड बनू शकतात या संघाचे प्रशिक्षक

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(rahul dravid) यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप विजयानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. टीम इंडियासोबत राहुल द्रविडचा करार या स्पर्धेपर्यंत होता. आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवानंतर त्यांचा करार बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपर्यंत वाढवला होता. या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाला अलविदा म्हटले.


आता ते इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रेंचायजी टीम राजस्थान रॉयल्ससोबत ते काम करू शकतात. २००८मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये राजस्थानने विजय मिळवला होता.


राहुल द्रविड हे प्रशिक्षकपदापासून दूर झाल्यानंतर आता त्यांचा पुढील प्रोजेक्ट काय असणार आहे याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. मिडिया रिपोर्टनुसार इंडियन प्रीमियर लीगमध्ये राहुल द्रविडचे कोच म्हणून पुन्हा पुनरागमन होऊ शकते. आपल्या जुन्या संघासोबत ते पुन्हा जोडले जाऊ शकतात. या संघाकडून खेळलेल्या राहुल द्रविड यांनी कर्णधार म्हणून दीर्घकाळ या फ्रेंचायझीला आपली सेवा दिली आहे. दरम्यान, रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे राजस्थानच्या संघाशी बातचीत सुरू आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.



राजस्थानसोबत राहुलचे करिअर


५१ वर्षीय राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत कर्णधार म्हणून खेळी केली आहे. त्यांनी २०१३मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० फायनलमध्ये पोहोचवले होते. द्रविडच्या नेतृत्वात खेळताना राजस्थानचा संघ प्लेऑफमध्येही खेळला होता.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना