INDW vs NEPW: टीम इंडियाचा बंपर विजय, नेपाळला ८२ धावांनी हरवले

  62

मुंबई: भारताच्या महिला संघाने नेपाळविरुद्ध ८२ धावांनी बंपर विजय मिळवला आहे. महिला आशिया कप २०२४च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आपले तीन सामने जिंकत ग्रुप एमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.


भारताने आधीच आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या लढतीत भारताने पहिल्यांदा खेळताना १७८ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने सातत्याने विकेट गमावल्या आणि २० षटकांत त्यांना केवळ ९६ धावा केल्या. या पराभवासोबतच नेपाळ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर गेली आहे.


भारताने नेपाळसमोर १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना २१ धावांच्या आत २ विकेट गमावले होते. दरम्यान कर्णधार इंदु बर्मा आणि सीता मगर यांनी मिळून २२ धावा केल्या. मात्र केवळ ६ बॉलच्या अंतराने दोन्ही फलंदाज बाद झाले. कर्णधार इंदुने १४ धावा आणि सीताने १८ धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर नेपाळच्या संघाने ५२ धावांवर ४ विकेट गमावल्या. येथूनच त्यांच्या विकेट पडत गेल्या आणि नेपाळने पुढील ४० धावांच्या आत ४ विकेट गमावल्या.



भारताची सेमीफायनलमध्ये धडक


भारताला महिला आशिया ग्रुपच्या एमध्ये स्थान देण्यात आले होते. टीम इंडियाने आपले तीन सामने मोठ्या अंतराने जिंकले आणि आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. ग्रुप एमधून भारताशिवाय पाकिस्ताननेही टॉप ४मध्ये स्थान मिळवले आहे. आता सेमीफायनलचे सामने ठरलेले नाहीत कारण ग्रुप बीचे २ सामने अद्याप बाकी आहेत.


Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार