Gold Silver Rate : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण

जाणून घ्या आजचे दर काय?


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोनं चांदीच्या (Gold Silver Price Hike) दरात मोठी वाढ झाली होती. सोनं चांदीने जवळपास लाखो रुपयांचा आकडा पार केला होता. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला महागाईचा चांगलाच फटका बसला होता. परंतु काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या दरात २७० रुपये तर चांदीच्या दरात ३३८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२ हजार ८९० रुपये तर चांदी ८ हजार ८६५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांना वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूतीचा कल आणि स्थानिक ज्वेलर्सकडून नवीन मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ७२,८९० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,२४० रुपयांवर ​​बंद झाली होती. तर चांदीही मागील ट्रेडमध्ये ८९,३७० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. ती आता ८९,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.



पाहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर


मुंबई, पुणे, नागपूर नाशिक या शहरात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,६९७ रुपये आहे. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,७६० प्रति १० ग्रॅमवर आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी