Accident news : अंत्यविधीवरुन परततानाच काळाचा घाला! ट्रकच्या धडकेत ३ जणांचा जागीच मृत्यू

जुन्नर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून पुण्याच्या जुन्नरमधून आणखी एक भीषण अपघाताची घटना (Junnar Accident) समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर (Kalyan Nagar Highway) भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण जखमी असल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीवरून परतत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.


पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की, अहमदनगरहून येणारा ट्रक आळेफाट्याच्या दिशेने उतारावर निघाला आणि सकाळी ११:१५ च्या सुमारास अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर धडकला. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात सुमारे सहा जण जखमीही झाले आहेत, अशी माहिती त्यानी दिली. पोलिसांनी जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले.


दरम्यान, या अपघातामुळे एकाच वेळी ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांचा कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको सुरु आहे. घटनास्थळी पोलीस पथकही दाखल झालं आहे.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात

उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर

Mahashivratri Wishes : संयम आणि शक्तीचा सुरेख संगम म्हणजे महाशिवरात्र, महाशिवरात्रीनिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महाशिवरात्र आपल्याला संयम, ध्यान आणि आंतरिक शांततेचे महत्त्व समजावून सांगते.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी

मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना