Accident news : अंत्यविधीवरुन परततानाच काळाचा घाला! ट्रकच्या धडकेत ३ जणांचा जागीच मृत्यू

जुन्नर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून पुण्याच्या जुन्नरमधून आणखी एक भीषण अपघाताची घटना (Junnar Accident) समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर (Kalyan Nagar Highway) भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण जखमी असल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीवरून परतत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.


पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की, अहमदनगरहून येणारा ट्रक आळेफाट्याच्या दिशेने उतारावर निघाला आणि सकाळी ११:१५ च्या सुमारास अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर धडकला. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात सुमारे सहा जण जखमीही झाले आहेत, अशी माहिती त्यानी दिली. पोलिसांनी जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले.


दरम्यान, या अपघातामुळे एकाच वेळी ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांचा कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको सुरु आहे. घटनास्थळी पोलीस पथकही दाखल झालं आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये