Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची तारांबळ

रेल्वे सेवाही विस्कळीत


मुंबई : दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने देखील पुढील तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. त्याप्रमाणे कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज पहाटेपासूनही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या (Railway Local) तिन्ही मार्गावरील लोकलसेवाही उशिराने सुरु आहे. यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.



रेल्वे लोकलसेवा उशिराने


मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. या पावासाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे. प्रवाशांसह सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.



या भागात मुसळधार पावसाचा अंदाज


मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाले आहे. तर गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम राहिला आहे. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबत जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत