Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची तारांबळ

रेल्वे सेवाही विस्कळीत


मुंबई : दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने देखील पुढील तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. त्याप्रमाणे कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज पहाटेपासूनही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या (Railway Local) तिन्ही मार्गावरील लोकलसेवाही उशिराने सुरु आहे. यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.



रेल्वे लोकलसेवा उशिराने


मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. या पावासाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे. प्रवाशांसह सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.



या भागात मुसळधार पावसाचा अंदाज


मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाले आहे. तर गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम राहिला आहे. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबत जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या