Leptospirosis : ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर ‘लेप्टो’चे संकट!

Share

१५ दिवसांत आढळले ५२ रुग्ण; १४,०५९ नागरिकांमध्ये आढळली सदृश लक्षणे

मुंबई : मुसळधार पावसासोबत (Heavy Rain) मुंबईकरांवर (Mumbai) लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) या आजाराच्या विळख्याचे संकट निर्माण झाले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत लेप्टोस्पायरोसिस आजाराचे १ ते १५ जुलै या १५ दिवसांत तब्बल ५२ रुग्ण आढळले असून, १४,०५९ नागरिकांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सदृश लक्षणे आढळून आली आहेत.

रस्त्यांवरील खड्डे, सखल भाग अशा ठिकाणी अनेकदा पाणी साचलेले दिसते. आपण देखील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जातो. मात्र, याच साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचे विषाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी बाहेर पडताना आपली काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

या संदर्भात पालिका प्रशासनाने म्हटले आहे की, लेप्टोसाठी महापालिका विशेष काळजी घेत आहे. लेप्टोस्पायरोसिस बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवत आहोत. आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ४३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे; तर ३२ लाख १० हजार ३९० मुंबईकरांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ८१,५५६ नागरिकांची ब्लड टेस्ट करण्यात आली, अशी माहिती पालिकेने दिली आहे. यासोबतच यासाठी १२४ आरोग्य शिबिरे घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तर लगेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होते. मग चर्चा सुरू होते ती, यंत्रणा काय करतात? करोडो रुपये खर्च करून महापालिका सुविधा देऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न पालिका प्रशासनाला विचारले जातात. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

53 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago