Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण या तालुक्यांतील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार पडला असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.



शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, आरोग्यमध्ये पदे रिक्त


ठाणे जिल्हा परिषदेत ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघू सिंचनमधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभागातील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे