Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण या तालुक्यांतील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार पडला असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.



शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, आरोग्यमध्ये पदे रिक्त


ठाणे जिल्हा परिषदेत ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघू सिंचनमधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभागातील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस