Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

  111

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण या तालुक्यांतील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार पडला असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.



शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, आरोग्यमध्ये पदे रिक्त


ठाणे जिल्हा परिषदेत ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघू सिंचनमधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभागातील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन