Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण या तालुक्यांतील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार पडला असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.



शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, आरोग्यमध्ये पदे रिक्त


ठाणे जिल्हा परिषदेत ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघू सिंचनमधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभागातील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

फिलिपाइन्समध्ये भूकंपाचा जोरदार धक्का; ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, त्सुनामीचा इशारा

मिंडानाओ, फिलिपाइन्स: फिलिपाइन्सच्या मिंडानाओ बेटाजवळ शुक्रवारी ( पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ