Watch: अशक्य झाले शक्य, १२ बॉलमध्ये हव्या होत्या ६१ धावा आणि मग…

Share

मुंबई: क्रिकेटमध्ये कधी काय होईल कोणीच याबाबत सांगू शकत नाही. तसेच म्हटलेच जाते की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे काय होईल काहीच सांगता येत नाही. असेच काहीसे चित्र युरोपियन टी१० लीगमध्ये पाहायला मिळाले. या लीगमध्ये एक सामना असा झाला की त्यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे.

तुम्ही कधी विचार केला का की एखाद्या संघाला विजयासाठी शेवटच्या १२ बॉलमध्ये ६१ धावा हव्या आहेत आणि तो संघ एक चेंडू राखून हे आव्हान पूर्णही करतो. तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे. मात्र हे घडले आहे. हो…खरंच. युरोपियन लीगमध्ये एका संघाला विजयासाठी शेवटच्या १२ बॉलमध्ये ६१ धावा हव्या होत्या आणि त्या संघाने एक चेंडू राखत हे आव्हान पूर्णही केले. या संघाच्या विजयाची टक्केवारी केवळ एक टक्के होती मात्र त्या संघाने बाजी पलटून लावली आणि हरलेला सामना जिंकला.

 

हा सामना ऑस्ट्रिया आणि रोमानिया यांच्यात खेळवण्यात आला होता. रोमानियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत १६८ धावांचे मोठे आव्हान दिले होते. रोमानियासाठी विकेटकीपर फलंदाज अरियान मोहम्मदने नाबाद १०४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रियाची धावसंख्या ८ षटकांत केवळ १०७ इतकी झाली होती. ऑस्ट्रियाला शेवटच्या २ षटकांत जिंकण्यासाठी ६१ धावांची गरज होती. विजयाची शक्यता केवळ एक टक्के इतकी होती. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये ३०.५ धावा हव्या होत्या.

ऑस्ट्रियाने ९व्या षटकांत ४१ धावा केल्या., यात ९ धावा या एक्स्ट्रा आल्या बाकी सर्व धावा बाऊंड्रीने आल्या. आता शेवटच्या षटकांत २० धावा करायच्या होत्या. या धावा ऑस्ट्रियाने केवळ पाच धावांत केल्या आणि एक बॉल राखत विजय मिळवला.

Tags: cricket

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago