Conservation of forts : गडावर मद्यप्राशन करणार्‍या टवाळखोरांना सरकारचा दणका!

Share

राज्य सरकार करणार कायद्यात बदल

नागपूर : गडकिल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी जाऊन गैरवर्तन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही टवाळखोर तरुण पर्यटनासाठी गडांवर जातात आणि त्या ठिकाणी मद्यप्राशन करतात. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी घाण, कचराही केला जातो. वास्तूवर काही ठिकाणी नावे कोरली जातात. असं घाणेरडं कृत्य करणाऱ्या टवाळखोरांना आता राज्य सरकार चांगलाच दणका देणार आहे. आधी यासाठी केवळ दंड आकारला जायचा, मात्र आता राज्य सरकार कायदा बदलण्याच्या तयारीत आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलली जातील, असं मुनगंटीवार म्हणाले. ते सोमवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक झाल्यासंदर्भात भाष्य केले. भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी १३ ते १४ कोटी रुपये खर्च व्हायचे. मात्र, यंदा गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल. संबंधित व्यक्तींनी सामोपचाराने ऐकले नाही तर कठोर पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

तसेच लंडनच्या वस्तूसंग्रहालयातून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या वाघनखांना घेऊन एका इतिहासकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यामुळे राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

22 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

54 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago