Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीMaharashtra Rain : आज कोकणात अतिवृष्टी तर 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Maharashtra Rain : आज कोकणात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी

मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) राज्यभर चांगलीच हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मुंबईमध्येही (Mumbai) पावसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Heavy Rain) असल्यामुळे हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात काही भागात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगडमध्ये काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

दरम्यान रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केला होता. तर आज घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -