Railway Job : दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांनाही मिळणार रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी!

  114

११हजाराहून अधिक पदांची भरती; 'असा' करा अर्ज


मुंबई : रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळाने तिकीट तपासणी (TC) पदासाठी मेगाभरती जारी केली आहे. अद्यापही रेल्वे मंडळाने याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केली नसून या महिन्याच्या अखेरपर्यंत नोकरीबाबत अधिसूचना देण्यात येईल. दरम्यान इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.


रेल्वे भरती मंडळाने टीसी पदासाठी तब्बल ११ हजार २५५ पदांची भरती काढली आहे. याबाबत सर्व माहिती RRB च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या नोकरीत २५००० ते ३४,४०० रुपये मासिक वेतन मिळू शकणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम नोकरीची संधी असणार आहे.



वयोमर्यादा


या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात येईल.



शैक्षणिक पात्रता


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. नंतर मुलाखतीचा राउंड होईल. या फेऱ्यांमध्ये पास झालेल्या उमेदवाराची या नोकरीसाठी निवड करण्यात येईल.



अर्ज शुल्क


या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये फी घेतली जाईल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून २५० रुपये फी घेतली जाईल.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.