Nepal landslide : नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनात दोन बसेस वाहून गेल्या!

७ भारतीयांसह ६५ जण बेपत्ता


काठमांडू : नेपाळच्या चितवन परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या (Nepal landslide) दुर्घटनेमुळे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या बसमध्ये असलेले ६५ जण बेपत्ता झाले आहेत. यात ७ भारतीयांचाही समावेश आहे. काठमांडूहून (Kathmandu) निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बसचा आज पहाटे ३.३० च्या सुमारास अपघात झाला. नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन्ही बस नदीत वाहून गेल्या.


मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रवाशांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश आहे. एंजेल बसमध्ये २४ तर गणपती डिलक्समध्ये ४१ जण होते. गौरकडे जाणाऱ्या बसमधील तीन प्रवासी वाहनातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले, असे पोलिसांनी सांगितले. चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, “बचावकार्य सुरू असून, भूस्खलनाचा ढिगारा हटवला जात आहे. बचावकार्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दलही सहभागी झाले आहेत.”



नेपाळचे पंतप्रधान काय म्हणाले?


नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ ‘प्रचंड’ म्हणाले की, “नारायणगड-मुग्लिन मार्गावर भूस्खलनात बस वाहून गेल्याच्या दु:खद घटनेने मला खूप वाईट वाटले. मी स्थानिक प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना प्रवाशांचा शोध आणि प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश दिले आहे” असे प्रचंड यांनी X वर पोस्ट शेअर करून सांगितले. देशाच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल