Bank Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १००हून अधिक पदांची मेगाभरती!

  141

मुंबई : सध्या अनेक तरुणांना सरकारी बँकेत नोकरी (Bank Job) करण्यासाठी संधी हवी असते. अशाच इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) १०० हून अधिक विविध पदांसाठी भरती जारी केली आहे.


बँक ऑफ महाराष्ट्रकडून ११५ पदांची भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२४ आहे, त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, अशी अधिसूचना जारी केली आहे.



'या' पदांची भरती


इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ विभागांसाठी भरती सुरू आहे. या विभागांमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि इतर पदांसाठी रिक्त जागा भरली जाणार आहेत.



शैक्षणिक पात्रता


अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार पदवी/मास्टर्स/पोस्ट ग्रॅज्युएशन/बी टेक/बीई इ. पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे.



'असा' करा अर्ज


भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवारांना प्रथम अधिकृत अधिसूचनेची PDF डाउनलोड करावी लागेल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना महत्त्वाची कागदपत्रे आणि अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट जोडून स्पीड पोस्टद्वारे बँकेकडे पाठवावा लागेल.


महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, 'लोक मंगल' १५०१, शिवाजी नगर, पुणे या पत्त्यावर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.


त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि उमेदवाराची निवड ही केली जाईल.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या