आरक्षणाबाबतची आपली भूमिका विरोधकांनी स्पष्ट करण्याची नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाबाबतची विरोधकांची भूमिका काय , त्यांना स्वतंत्र आरक्षण हवे आहे की, ओबीसी मधून हवे यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली . मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने बैठक बोलवली होती. मात्र त्यावर विरोधकांनी पाठ फिरवली होती. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असेल तर सभागृहात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. त्याचा खरपूस समाचार नितेश राणे यांनी विधानसभेत घेतला


ते पुढे म्हणाले की, विरोधक हे दोन समाजाची धूळफेक करत असून ओबीसी तरुणांचे भविष्य अंधारात टाकत आहेत. काल बैठकीला न जाऊन विरोधकांचे खरे चेहरे समोर आले असून , विरोधकांचे लोकप्रतिनिधी स्वत्रंत्र आरक्षणाची मागणी करतात व सभागृहातील नेते ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत हे नकली चेहरे महाराष्ट्रासमोर येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विरोधकांमुळे मराठा व ओबीसी समाजाचे भविष्य अंधारात टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली .


दरम्यान मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करायचा आहे, आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद चिघळत ठेवून महाराष्ट्रातील शांतता भंग करायची असल्याचा आरोप करत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत घोषणाबाजी केली आणि सभागृहात गदारोळ गोंधळ झाला. अखेर अखेर विधानसभा अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित