Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर इतिहासात टीम इंडियाचे २५वे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेत गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून जॉईन करतील. दरम्यान, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण अंतरिम प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून गंभीरला हेड कोच बनवण्याबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.


 


गंभीरच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर बनली आयपीएल चॅम्पियन


द्रविडचा कार्यकाळ संपण्याच्या बातम्या येण्यासोबतच गौतम गंभीर पुढील प्रमुख प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आता जय शाह यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे गंभीर प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या