Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांची मोठी घोषणा

  87

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर इतिहासात टीम इंडियाचे २५वे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेत गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून जॉईन करतील. दरम्यान, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण अंतरिम प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून गंभीरला हेड कोच बनवण्याबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.


 


गंभीरच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर बनली आयपीएल चॅम्पियन


द्रविडचा कार्यकाळ संपण्याच्या बातम्या येण्यासोबतच गौतम गंभीर पुढील प्रमुख प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आता जय शाह यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे गंभीर प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार