Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर इतिहासात टीम इंडियाचे २५वे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेत गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून जॉईन करतील. दरम्यान, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण अंतरिम प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून गंभीरला हेड कोच बनवण्याबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.


 


गंभीरच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर बनली आयपीएल चॅम्पियन


द्रविडचा कार्यकाळ संपण्याच्या बातम्या येण्यासोबतच गौतम गंभीर पुढील प्रमुख प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आता जय शाह यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे गंभीर प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण