Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर इतिहासात टीम इंडियाचे २५वे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेत गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून जॉईन करतील. दरम्यान, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण अंतरिम प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.


बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून गंभीरला हेड कोच बनवण्याबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.


 


गंभीरच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर बनली आयपीएल चॅम्पियन


द्रविडचा कार्यकाळ संपण्याच्या बातम्या येण्यासोबतच गौतम गंभीर पुढील प्रमुख प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आता जय शाह यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे गंभीर प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस