
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा
मुंबई : मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मुंबईचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे तर रेल्वेसेवाही (Mumbai Railway) ठप्प झाली आहे. काही रेल्वे जागच्या जागी थांबल्या, त्यामुळे प्रवासी थेट पटरीवर उतरले आणि चालत निघाले. हार्बर रेल्वेसेवा (Harbour railway) देखील बंद झाली आहे. यामुळे या मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध असणार आहे. नेमक्या या बसेस कुठून व कधी सुटणार हे जाणून घ्या.
आज ८ जुलै रोजी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद असल्याने तेथे अडकलेल्या प्रवाशांसाठी या बसेस असणार आहेत- १) पनवेल ते दादर मार्गावर ९.००, ९.०५, १०.१५, १०.३०, १०.४० २) पनवेल ते वाशी १०.२० ३) उरण ते दादर ५.३०, ६.३०, ७.००, ७.३०, ८.१५, ८.४५, ९.१०, ९.३०, १०.३०त्याचप्रमाणे मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने येथील प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, त्र्यंबकेश्वर, सातारा, कराड या बसेस तसेच श्रीवर्धन रायगड, चिपळूण, शिवथर रत्नागिरी बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानका (सीएसएमटी) वरुन सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.