Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली


दिसपूर : सध्या देशभरात सगळीकडे पावसाचे वातावरण (Rain updates) आहे. त्यातच ईशान्येकडील राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आसाममध्ये पूर (Assam flood) आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा यांसारख्या राज्यातील प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जवळपास २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. तर गेल्या आठवड्यापासून पूरसंबंधित अपघातांमुळे आतापर्यंत ५२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


सरकारच्या माहितीनुसार, आसामच्या २९ जिल्ह्यांमध्ये एकूण २३,९६,६४८ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ६८,७६८.५ हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. एकूण ५३,४२९ बाधित लोकांनी ५७७ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.



आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडिलांची शोधमोहिम सुरु


दुसरीकडे गुवाहाटी येथील नाल्यात बुडालेल्या आठ वर्षांच्या अभिनाश नावाच्या मुलाचा शोध सुरू आहे. अभिनाश बेपत्ता होऊन तीन दिवस झाले, मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. अभिनाशचे वडील हिरालाल सरकार हे एकटेच आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. झडती घेतली असता त्यांच्या मुलाची चप्पल सापडली. हिरालाल म्हणाले, "मी त्याला शोधतोय मला फक्त माझ्या मुलाची चप्पल सापडली आहे. सरकारकडे यंत्रणा आहे, त्यांना माझा मुलगा शोधावा लागेल."



पुराने वन्य प्राण्यांचाही घेतला जीव


आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) मध्ये आलेल्या विनाशकारी पुराने ११४ वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केएनपीमध्ये चार गेंडे आणि ९४ हॉग डीअरचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या इतर ११ जनावरांचाही यात समावेश आहे.



कोणत्या जिल्ह्यांना पुराचा फटका?


आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये गोलपारा, नागाव, नलबारी, कामरूप, मोरीगाव, दिब्रुगढ, सोनितपूर, लखीमपूर, दक्षिण सलमारा, धुबरी, जोरहाट, चरैदेव, होजई, करीमगंज, शिवसागर, बोंगईगाव, बारपेटा, धेमाजी, हैलाकांडी, बिरहाटवा, गोलाकांडी या जिल्ह्यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या