Sunday, October 19, 2025
Happy Diwali

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला कधीच आवडत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या घरांमध्ये लक्ष्मी माता तेथे न गेल्याने तेथील आर्थिक परिस्थिती नेहमी कंगाल राहते.

आचार्य चाणक्य यांच्या मते लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही. ती घाण असलेल्या जागेवर कधीही वास करत नाही. ज्या घरात कधी साफसफाई होत नाही तेथे लक्ष्मी मातेला जायला आवडत नाही. त्या घरात नेहमी आर्थिक तंगी राहते.

आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरात नेहमी वाद-विवाद सुरू असतात. कलह होत असतात तेथे लक्ष्मी माता जात नाही. यामुळे कधीही घरात कलहाचे वातावरण असले नाही पाहिजे.तसेच सुख-शांती आणि प्रेमासोबत राहिले पाहिजे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते.

जर धन देवता लक्ष्मी माता एखाद्यापासून नाराज असेल तर त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरू होतात. लक्ष्मी माता नाराज झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या खिशावर होतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा