Champions Trophy: भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये! १ मार्चला भिडणार रोहित-बाबरचे संघ

  49

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर अद्याप मायदेशी परतलेले नाहीत. त्यातच त्यांचा २०२५मधील सगळ्यात मोठा सामना ठरला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अस्थायी कार्यक्रम जारी केला आहे.


यात भारत-पाकिस्तानचा सामना एक मार्चला ठेवण्यात आला आहे. दरम्यान बीसीसीआयने या वर अद्याप सहमती दर्शवलेली नाही. स्पर्धा पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत खेळवली जाईल. यात १० मार्च रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.


आयसीसीच्या बोर्डाच्या वरिष्ठ सदस्यांनी बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अस्थायी वेळापत्रक जारी केले. सूत्रांच्या माहितीनुसार पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी १५ सामन्यांचा कार्यक्रम सोपवला. यात भारताचे सामने सुरक्षा आणि लॉजिस्टिकल कारणांमुळे लाहोरमध्ये ठेवण्यात आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ संघादरम्यान एकूण १५ सामने खेळवले जातील.


आयसीसी बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, पीसीबीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सामन्यांच्या कार्यक्रमाचा मसुदा सोपवला आहे. यात सात सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराचीमध्ये तर पाच सामने रावळपिंडीमध्ये ठेवण्यात आले आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार पहिला सामना कराचीमध्ये ठेवण्यात आला आहे. तर दोन सेमीफायनल कराची आणि रावळपिंडीमध्ये तर फायनलचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. भारताला ग्रुप एमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, न्यूझीलंडसोबत ठेवण्यात आले आहे. ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून