मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा खिताबी सामना २९ जूनला होणार आहे. मात्र आतापर्यंत वर्ल्डकपच्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ रंगला आहे.
आता बातमी समोर आली आहे की २९ जूनला बार्बाडोसमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान फायनल सामन्यासाठी ३० जूनचा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवला आहे. जर २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर त्या स्थितीत काय होईल?
भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. जर फायनल सामना पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे उशिराने होत असेल तर त्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. सामन्याचे निकाल तेव्हाच लागू शकतात जेव्हा दोन संघ कमीत कमी १०-१० षटकांचा खेळ करेल. जर एखादा संघ १०-१० षटकांचा खेळ करू शकले नाही तर सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी शिफ्ट केला जाईल.
आयसीसीच्या नियमांतर्गत फायनल सामना होऊ शकला नाही अथवा टाय झाल्यास सुपर ओव्हर केली जाऊ शकते. जर रिझर्व्ह डेला कोणताही संघ विजेता बनू शकला नाही अथवा सुपर ओव्हरही झाली नाही तर फायनल सामन्याचा निकाल नो-रिझल्ट म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर नसल्याच्या स्थिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. दरम्यान, टी-२० वर्ल्डकच्या १७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेतेपद दिले गेलेले नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…