IND vs SA Final: फायनलवर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोण बनणार चॅम्पियन?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा खिताबी सामना २९ जूनला होणार आहे. मात्र आतापर्यंत वर्ल्डकपच्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ रंगला आहे.


आता बातमी समोर आली आहे की २९ जूनला बार्बाडोसमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान फायनल सामन्यासाठी ३० जूनचा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवला आहे. जर २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर त्या स्थितीत काय होईल?



जर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात आला पाऊस


भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. जर फायनल सामना पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे उशिराने होत असेल तर त्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. सामन्याचे निकाल तेव्हाच लागू शकतात जेव्हा दोन संघ कमीत कमी १०-१० षटकांचा खेळ करेल. जर एखादा संघ १०-१० षटकांचा खेळ करू शकले नाही तर सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी शिफ्ट केला जाईल.



जर रिझर्व्ह डेच्या दिवशी झाला पाऊस


आयसीसीच्या नियमांतर्गत फायनल सामना होऊ शकला नाही अथवा टाय झाल्यास सुपर ओव्हर केली जाऊ शकते. जर रिझर्व्ह डेला कोणताही संघ विजेता बनू शकला नाही अथवा सुपर ओव्हरही झाली नाही तर फायनल सामन्याचा निकाल नो-रिझल्ट म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर नसल्याच्या स्थिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. दरम्यान, टी-२० वर्ल्डकच्या १७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेतेपद दिले गेलेले नाही.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून