IND vs SA Final: फायनलवर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोण बनणार चॅम्पियन?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा खिताबी सामना २९ जूनला होणार आहे. मात्र आतापर्यंत वर्ल्डकपच्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ रंगला आहे.


आता बातमी समोर आली आहे की २९ जूनला बार्बाडोसमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान फायनल सामन्यासाठी ३० जूनचा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवला आहे. जर २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर त्या स्थितीत काय होईल?



जर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात आला पाऊस


भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. जर फायनल सामना पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे उशिराने होत असेल तर त्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. सामन्याचे निकाल तेव्हाच लागू शकतात जेव्हा दोन संघ कमीत कमी १०-१० षटकांचा खेळ करेल. जर एखादा संघ १०-१० षटकांचा खेळ करू शकले नाही तर सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी शिफ्ट केला जाईल.



जर रिझर्व्ह डेच्या दिवशी झाला पाऊस


आयसीसीच्या नियमांतर्गत फायनल सामना होऊ शकला नाही अथवा टाय झाल्यास सुपर ओव्हर केली जाऊ शकते. जर रिझर्व्ह डेला कोणताही संघ विजेता बनू शकला नाही अथवा सुपर ओव्हरही झाली नाही तर फायनल सामन्याचा निकाल नो-रिझल्ट म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर नसल्याच्या स्थिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. दरम्यान, टी-२० वर्ल्डकच्या १७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेतेपद दिले गेलेले नाही.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख