Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीZika virus : झिका व्हायरसचा वाढता धोका! आत्ताच जाणून घ्या कशी घ्याल...

Zika virus : झिका व्हायरसचा वाढता धोका! आत्ताच जाणून घ्या कशी घ्याल काळजी?

मुंबई : देशभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) काहीसा नष्ट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र ऐन पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यातच आणखी एका व्हायरसमुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात ‘झिका’ (Zika virus) व्हायरसमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा प्रादुर्भाव झाला होता. आता त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्याने पुणेकरांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.

या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. संतुलित आहार या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतो. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार शरीराला ऊर्जा तर देतोच पण तो आतून आपल्याला निरोगी बनवतो. त्यामुळे जाणून घेऊयात की झिका व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण कशी काळजी घेऊ शकतो.

प्रथिनेयुक्त आहार घ्या

झिका विषाणूची लागण झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील स्नायू कमजोर होऊ लागतात. त्यामुळे, रुग्णाला अशक्तपणा जाणवू शकतो. या परिस्थितीमध्ये लवकर बरे होण्यासाठी रुग्णाच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. कारण, प्रथिने शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी तुम्ही आहारात, डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.

शरीर हायड्रेटेड ठेवा

झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फायदेशीर आहे. खास करून जेव्हा तुमचे शरीर एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक प्रमाणात द्रवपदार्थाची आवश्यकता असते. जेणेकरून आपल्या शरीरातील विषारी घटक आणि संसर्ग बाहेर काढता येतील.

द्रवपदार्थांचा आहारात करा समावेश

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि फळांचे ज्यूस इत्यादी द्रवपदार्थाचा आहारात जरूर समावेश करा. तसेच, काकडी आणि संत्र्यांचा आहारात अवश्य समावेश करा. यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. रुग्णाला आजारी पडल्यावर पुरेशी भूक लागत नाही आणि तोंडाची चवही जाते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आणि द्रवपदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -