OBC Reservation : ओबीसींच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी २९ जूनला बोलावली महत्त्वाची बैठक!

सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना करणार निमंत्रित


मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी (Maratha Vs OBC) समाजाने आरक्षणाबाबत (Reservation) परस्परविरोधी मागण्या केल्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हा सगळा तिढा सोडवण्यासाठी २९ जून म्हणजे शनिवारी राज्य सरकारकडून मुंबईत ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय, राज्यातील ओबीसी नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी पाचारण केले जाणार आहे. त्यामुळे २९ जूनच्या बैठकीत ओबीसी नेते काय बोलणार आणि राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दहाव्या दिवशी उपोषण स्थगित करत असताना ओबीसीतून इतर कोणत्याही प्रवर्गाला आरक्षण दिले जाणार नाही, याचे लेखी आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर २९ जूनच्या बैठकीत चर्चा होणार आहे. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भातही यावेळी चर्चा केली जाऊ शकते.


तसेच मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, असा पण केला आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होऊ शकते.

Comments
Add Comment

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची

पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांत पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच