योगी सरकारचा निर्णय; पेपरफुटीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि १ कोटी रुपयांचा दंड

Share

लखनऊ : गेल्या काही दिवसांपासून देशभरात NEET आणि UGC NET पेपरफुटी प्रकरणाने चांगलाच जोर पकडला आहे. आतापर्यंत अनेकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारने पेपर लीक करणाऱ्या माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीविरोधात अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा अध्यादेश लागू होताच या माफियांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

योगी सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार पेपरफुटीप्रकरणी आरोपींना दोन वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांना तब्बल १ कोटींचा दंडही भरावा लागणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

फेब्रुवारीमध्ये यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा आणि त्याआधी आरओ आणि एआरओचे पेपर लीक झाले होते. त्यानंतर सरकार लवकरच पेपरफुटीविरोधात कडक कायदा आणू शकते, असे संकेत मिळत होते. आता सरकार एका अध्यादेशाद्वारे पेपरफुटीविरोधात नवा कायदा आणत आहे. योगी सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी नवीन धोरणही जाहीर केले आहे. या अंतर्गत प्रत्येक शिफ्टमध्ये २ किंवा अधिक पेपर सेट असणे आवश्यक आहे. प्रत्येक संचाच्या प्रश्नपत्रिकांची छपाई वेगळ्या एजन्सीमार्फत केली जाईल. परीक्षा केंद्रांसाठी सरकारी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये किंवा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची निवड केली जाईल.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

18 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

46 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago