नवी दिल्ली : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणा सरकारच्या विरोधात सुरु केलेले त्यांचे बेमुदत उपोषण थांबवले आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने आतिशी यांनी उपोषण थांबवल्याची माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.
हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू होते. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ३६ पर्यंत खाली आली आहे. अतिशी यांच्यावर लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मध्यरात्री ४३ पर्यंत खाली आले होते आणि पहाटे ते ३ वाजता ते ३६ पर्यंत खाली आले, असे सांगत आपने आतिशी यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेत असतानाचे फोटो एक्सवर शेअर केले होते.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…