Accident news : ट्रकवरील सामानाची दोरी सुटली आणि लोखंड थेट पादचाऱ्याच्या डोक्यात पडलं!

Share

भीषण दुर्घटनेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांत अपघात व दुर्घटनांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरातून आणखी एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. एका मालवाहू ट्रकवर बांधलेल्या लोखंडी सामानाची दोरी सुटली आणि त्यातील लोखंड रस्त्याच्या कडेने फुटपाथवर चाललेल्या एका पादचाऱ्याच्या डोक्यात पडलं. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय असराणी (वय ४०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ट्रक हा रविवारी रात्री लोखंडी साहित्य घेऊन मुंबई कोस्टल रोडच्या कामासाठी निघाला होता. हा ट्रक वांद्रे येथील टर्नर रोड (Turner Road) परिसरात आला तेव्हा झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला वाहन घासले गेले. त्यामुळे ट्रकवर बांधलेली दोरी अचानक तुटली. यावेळी विजय असराणी हे शेजारच्या फुटपाथवरुन चालत होते. ट्रकची दोरी तुटल्यानंतर त्यामधील लोखंडी साहित्य आणि लोखंडाचे भाग सुटे झाले. यापैकी एक लोखंडी भाग रस्त्यावरुन चालत असलेल्या विजय असराणी यांच्या अंगावर पडला.

विजय असराणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजुबाजूच्या लोकांनी विजय असराणी यांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

26 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

58 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago