Friday, June 28, 2024
Homeक्रीडाIND vs AUS: आता ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपचा बदला घेणार भारत, कांगारूंना टी-२०...

IND vs AUS: आता ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपचा बदला घेणार भारत, कांगारूंना टी-२० वर्ल्डकपमधून करणार बाहेर?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सोमवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर सेमीफायनलमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा फारच कमी होतील. तर टीम इंडियाकडे कांगारूंकडून २०२३मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

या पद्धतीने ऑस्ट्रेलिया होणार बाहेर

जर रोहित ब्रिगेडने सोमवारी ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अफगाणिस्तानने सुपर ८मधील आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाद होतील. कागारूंनी २०२३वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला हरवले होते. अशातच टीम इंडियाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

पाऊस बनू शकतो व्हिलन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. दोन्ही संघादरम्यानचा सामना सेंट ल्युसिया येथे खेळवला जाणार आहे. रविवारी येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारीही येथे पावसाची शक्यता आह. जर हा सामना पावसाने धुतला गेला तर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -