अलिबाग : मुंबईतील बांद्रा येथील रिझवी कॉलेजच्या एनसीसी विभागातील चौघा विद्यार्थ्यांचा खालापूर हद्दीतील मोरबा डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रिझवी कॉलेजच्या एनसीसीमधील ३७ मुले/मुली खालापूर पोलिस ठाणे हद्दीत मोरबा डॅम साईबंधारा येथे कैंपसाठी आलेली आहेत. शुक्रवारी २१ जुन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पैकी एक मुलगा पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेली अन्य तीन मुलेही डॅमच्या पाण्यात बुडाली होती. रेस्क्यू टीमच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
बुडालेल्यांमध्ये एकलव्य सिंग (वय १८ वर्षे), ईशांत यादव (वय – १९ वर्षे), आकाश धर्मदास माने (वय २६ वर्षे), रणथ महादू बंदा (वय १८ वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…