Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाT20 World Cup 2024: भारताला बनायचे असेल चॅम्पियन तर करावी लागतील ही...

T20 World Cup 2024: भारताला बनायचे असेल चॅम्पियन तर करावी लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये पोहोचेपर्यंत कोणताही सामना हरलेला नाही. मात्र आता खरी परीक्षा सुरू होत आहे. यूएसएची पिच आतापर्यंत गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. याचा जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भरपूर फायदा उचलला. पाकिस्तान आणि यूएसएविरुद्धच्या सामन्यात एकवेळेस टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. यावरून संकेत होते की संघामध्ये काही कमकुवत बाबी जरूर आहेत

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा फॉर्म पाहता भारतासाठी हा रस्ता काही सोपा नाही. भारत २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेला नाही.

विराट कोहलीने धावा काढाव्यात

विराट कोहली टी-२० वर्ल्डकपच्या सुरूवातीपासून रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका निभावत आहे. त्याने आतापर्यंतच्या ३ सामन्यात केवळ ९ बॉल क्रीझवर टिकून होता. यात त्याने केवळ ५ धावा केल्यात. कोहलीला भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. अशातच त्याने फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे.

टीममध्ये रिस्ट स्पिनर महत्त्वाचा

भारताच्या टी-२० वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या रूपात २ रिस्ट स्पिनर आहेत. मात्र अद्याप त्यांचा उपयोग करण्यात आलेला नाही. आता वर्ल्डकपचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहे. येथे पिच स्पिन गोलंदाजीसाठी अनुकूल ठरू शकते.

मधल्या फळीत सातत्य

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रूात भारताचे सलामीचे फलंदाज वर्ल्डकपमध्ये निष्फळ ठरले आहेत. दरम्यान तिसऱ्या स्थानावर खेळताना ऋषभ पंतने सर्व सामन्यात टिकून फलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी अपयशी ठरल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव येत आहे. अशातच सूर्यकुमारने एका अर्धशतकाशिवाय २ डावांत केवळ ९ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -