Nitesh Rane : महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा!

आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धरले धारेवर


महाड : महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणात गोरक्षक हिंदू तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेवर पोलिसांकडून कारवाई मात्र संथ गतीने सुरु असल्याने या प्रकरणी जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे हे काल रात्री महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या ठिकाणी डिवायएसपी शंकर काळे व महाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांना आमदार राणे यांनी धारेवर धरले.


गोवंश हत्या करणाऱ्या या कसायांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहे. जनावरांची होणारी तस्करी व कत्तल रोखणे हे पोलिसांचे काम असून ते काम करणाऱ्या गोरक्षकांनाच जर या कसायांकडून मारहाण होत असेल तर आपण ते खपवून घेणार नाही असा सज्जड दम आमदार राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भरला.


दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे महाड तालुक्यातील संबंधित कत्तलखाने ताबडतोब उद्ध्वस्त करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात कारवाई न केल्यास आम्हाला हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा राणे यांनी दिला आहे.


बुधवारी रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक शंकर काळे यांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी गोरक्षकांविरोधात झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांना जाब विचारला. कायद्याचे राज्य असताना अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना या दुर्दैवी व संतापजनक आहेत. गाईचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर झालेला हल्ला यापुढे आम्ही सहन करणार नाही, संबंधितांना जशास तसे उत्तरे देऊ, अशा शब्दात त्यांनी डीवायएसपी शंकर काळे यांना दरडावले.


संबंधित समाजकंटकांकडून पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत होते कशी, असा सवाल करून या घटनेनंतरही गोरक्षकांना दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी सहन करणार नाही व गोरक्षकांविरोधात कारवाई केल्यास विधानसभेमध्ये जाब विचारू असे ते म्हणाले. कायदा सर्वांना समान आहे तर या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण काय, संबंधित दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी महाड पोलादपूरमधील गोरक्षकांसह शेकडो हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते.

Comments
Add Comment

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक

निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार

Maharashtra Nagar Parishad Election : मतदान केंद्रांवर गर्दी! महाराष्ट्रात मतदानाच्या टक्केवारीत सकारात्मक वाढ; आतापर्यंत आकडे काय सांगतात?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या

Nagarparishad Election Result : उद्याची मतमोजणी रद्द! उच्च न्यायालयाच्या आदेशाने निकालाची तारीख ढकलली पुढे, निकाल आता 'या' दिवशी लागणार!

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत