सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवांची प्रमाणबद्धता

Share

डॉ. जे. एन. श्रीवास्तव, डॉ. के. मदन गोपाल, डॉ. स्वर्णिका पाल, डॉ. अर्पिता, डॉ. अभय दहिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान (The National Health Mission – NHM) हा आरोग्यविषयक सर्वंकष सेवा-सुविधा सर्वत्र आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रामुख्याने आदिवासी तसेच आजवर अशा सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत आरोग्यविषयक पायाभूत सेवा-सुविधा बळकट करणे, मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांच्या पुरवठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला गेला आहे. या उपक्रमाअंतर्गतच्या अशा एकजिनसी प्रयत्नांमधून सार्वजनिक आरोग्यविषयक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच आरोग्यविषयक पायाभूत सेवा-सुविधा देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या देशाच्या समर्पणाचेच प्रतिबिंब उमटले असल्याचे निश्चितच म्हणता येईल.

विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताने आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांद्वारे लोकसंख्यावाढीचे स्थिरीकरण, माता, अर्भक आणि बाल आरोग्य तसेच संसर्गजन्य रोगांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे. अशा निर्देशांकांच्या घसरणीचा विशेषत: माता, अर्भक आणि पाच वर्षांखालील मृत्यूदरासारख्या निर्देशकांमधील घट यांचा आपल्या देशातील सरासरी दर हा जागतिक सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. मात्र असे असले तरीदेखील देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर वाढती लोकसंख्या, उद्भवणारे नवे आजार, सातत्याने बदलणारी स्थिती, आरोग्यविषयक स्थितीनुसार योग्य उपचरांसाठीच्या सोयीची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अशा प्रकारची आव्हाने कायमच समोर येत राहिली आहेत.

आरोग्य सेवा-सुविधा व्यवस्थेचे बळकटीकरण आणि आरोग्यविषयक सेवांच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न :
देशातील आरोग्यविषयक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र असे असले तरी सार्वजनिक आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा क्षमतेपेक्षा कमी वापर, अयोग्य किंवा असुरक्षित उपचार, चुकीचे निदान आणि रुग्णांचा आदर न करणारी आरोग्यविषयक सेवा ही आणि अशी अनेक आव्हाने बऱ्याच अंशी आजही कायम आहेत.

खराब आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळाची कमतरता (human resources of health – HRH) आणि रुग्णांची निगा घेण्याची निकृष्ट सेवा यांसारख्या बाबी, देशातील आरोग्यविषयक व्यवस्था ढासळण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमागची मुख्य कारणे असतात. अनपेक्षित तरीही वेळेवर योग्य उपचार देता आले तर टाळता येण्याजोगे मृत्यू, खराब आरोग्यविषयक स्थिती, औषधोपचारांसाठी नागरिकांवर पडणारा आर्थिक भार आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वास गमावला जाण्यासारख्या घटनांशी याचा थेट संबंध आहेच.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

37 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

42 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago