केजरीवालांचा ‘तिहार’मधील मुक्काम ३ जुलैपर्यंत वाढला

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) आज सुनावणी झाली. यावेळी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून २१ दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आज अरविंद केजरीवाल आणि विनोद चौहान यांची न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे दोघांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.


मात्र, यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानंतर राऊस एव्हेन्यू येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडी वाढ केली.


विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती विंदू यांच्या न्यायालयात आजची सुनावणी झाली. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू आणि केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी न्यायालयात उपस्थित होते. दोघांनीही आपापल्या बाजूने युक्तीवाद केला. सुनावणीदरम्यान, सीएम अरविंद केजरीवाल यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने त्यांच्या न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेला विरोध करत केजरीवाल यांची कोठडी वाढवण्यासाठी कोणताही आधार नाही, असा युक्तीवाद केला. तर ईडीच्या वकिलाने सांगितले की, विनोद चौहान यांनी गोवा निवडणुकीसाठी के कविता यांच्या पीएकडून अभिषेक बोईनपल्ली यांच्यामार्फत २५ कोटी रुपये घेतले होते. हे दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने न्यायालयीन सुनावणीत वाढ केली.


मद्य घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, राजधानीतील दारू व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बदल्यात पंजाबमधील व्यावसायिकांकडूनही लाच घेण्यात आली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, आम आदमी पार्टी (आप) ची सत्ता असलेल्या पंजाबमधील ज्या व्यावसायिकांनी लाच दिली नाही त्यांना शेजारच्या राज्यात दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती.


दरम्यान, पदावर असताना अटक होणारे अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांचे साथीदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला