वसई : प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना वसईतून समोर आली आहे. वसईत भर रस्त्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पान्याने वार करत तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, तो हे कृत्य करत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली असूनही वाचवायला मात्र कोणीच पुढे आलं नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील चिंचपाडा येथे एका वीस वर्षीय तरुणीला आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका तरुणाने बेदम मारहाण केली. हल्लेखोराने स्पॅनरचा वापर करून तिच्या डोक्यावर हल्ला केला. ती तडफडत असताना तो तिच्यावर वार करतच राहिला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला अडवण्याची हिंमत केली नाही. हे वार करत असताना तो सतत ‘माझ्यासोबत असं का केलं?’ असा प्रश्न विचारत होता. ती मेल्यानंतर देखील तो प्रश्न विचारत होता. या अत्यंत क्रूर प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे. तर आरती यादव असं मृत तरुणीचं नाव आहे. सध्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.
वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने १६ वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकूचे ४० वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडाचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…