विधानसभेपूर्वी महायुतीत चाचपणी!

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजपा नेत्यांची मागणी?


मुंबई : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपाने महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती.


तरीही महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीचा धुव्वा उडवला. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद धूसफूसत असून, आरएसएसने केलेल्या जाहीर टीकेनंतर आता अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये नको, अशी मागणी सेना-भाजप नेते करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये ठेवण्याच्या बाबतीत पुनर्विचार करावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजप उमेदवारांना मिळाली नसल्याचा आरोप हे नेते करत आहेत.


त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जिथे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे सेना-भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे हे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आता महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय असे हे नेते म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, "माढा, सोलापूर आणि दिंडोरीमध्ये आमच्या आमदारांनी काम केले आहे."


या सर्व घडामोडीत अजित पवार यांच्या पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षात नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर भुजबळ यांनी पक्ष सोडला तर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसू शकतो.


लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यांनी १३ जागी विजय मिळवला. यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी ९ जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघ्या १० जागा लढवत ८ जगांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागांवर यश मिळाले. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कसाबसा आपला गड कायम राखला. राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून