Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले...पाहा कोणाचे रंगणार सामने

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८चे सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक सेट झाले आहे.


सुपर ८मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमधून भारतासोबत यूएसएनेही सुपर ८साठी क्वालिफाय केले आहे. भारताचा सुपर ८मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बारबाडोस येथे २० जूनला खेळवला जाईल.


भारतीय संघ सुपर ८मधील सर्व सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळेल. त्यांचा दुसरा सामना २२ जूनला आहे. हा सामना अँटिग्वा येथे होईल. येथे त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. मात्र हा संघ अद्याप ठरलेला नाही. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना सेंट लूसियामध्ये २४ तारखेला खेळवला जाईल.



सुपर ८चे सामने नसणार सोपे


जर भारताचे सुपर८मधील सामने पाहिले तर त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. अफगाणिस्तानचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप सामन्यांमध्ये न्यूझीलंडलाही हरवले. दरम्यान, टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. भारताचा एक सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया संघही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड