Post Office Scheme : आनंदवार्ता! पोस्टाने आणली 'ही' भन्नाट योजना

गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा


मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे महत्त्वाचे असते. देशभरात गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. दरम्यान पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Scheme) अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. त्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. आताही पोस्टाने गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळणार असल्याचा दावा पोस्टाकडून करण्यात आला आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



किसान विकास पत्र योजना


किसान विकास पत्र (KVP) ही पोस्टाची लोकप्रिय योजना आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवे तितके पैसे गुंतवू शकणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना परतावा देखील मिळणार आहे. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते.



योजनेत मिळणार इतका व्याजदर


पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते.



५ लाख रुपये गुंतवा १० लाख रुपये मिळवा


जर तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच ११५ महिने या योजनेत पैसे ठेवले तर ७.५ टक्के व्याजाच्या आधारे ५ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर १० लाख रुपये मिळतील. त्यामुळे या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव