Patana news : गंगा स्नानासाठी १७ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत बुडाली!

१३ जणांना वाचवण्यात यश तर ४ जण बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु


पाटणा : गेल्या काही दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वारंवार अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यातच आज बिहारच्या (Bihar) पाटणा (Patna news) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगा नदीवर (Ganga river) स्नान करण्यासाठी निघालेल्या भाविकांची बोट अचानक बुडाली (Patna Boat Capsizes). यामध्ये १७ प्रवासी होते, त्यातील १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर ४ जण बेपत्ता आहेत. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्याच्या निमित्ताने बिहारच्या गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गंगा स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत असतात. अशामध्येच गंगा दसऱ्याच्या दिवशीच पाटण्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. भाविकांना गंगास्नान करण्यासाठी घेऊन जाणारी बोट नदीमध्ये बुडाली. अचानक बोटीचे संतुलन बिघडले. त्यामुळे बोट नदीच्या मध्यभागी पलटी झाली. १७ जण या बोटीतून प्रवास करत होते. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.


१७ जणांपैकी काही जण पोहत नदीच्या काठावर आले तर काही जणांचे प्राण वाचवण्यात स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमला यश आले. १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे व त्यांची प्रकृती ठीक आहे. तर उरलेल्या ४ जणांचा शोध सुरु आहे. एनएचएआयचे निवृत्त अधिकारी अवधेश प्रसादही बेपत्ता आहेत. अवधेश प्रसाद महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले. तर त्याची पत्नी बचावली आहे. पोलीस एसडीआरएफ टीमच्या मदतीने गंगा नदीत सर्च ऑपरेशन करत आहेत.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१