मिरचीपुराण : कविता आणि काव्यकोडी

  46

वावरातून आले थेट
मी घरची ना दारची
मी लवंगी मिरची
आहे कोल्हापूरची


घरच्या घरी वाळवून
कुटून ठेवतात मला
तिखट हवं तेव्हा
मग येते मी कामाला


खात्री देत नाही मी
विकतच्या मसाल्याची
पोट बिघडलं तुमचं की
बोलणी आम्ही खायची


भाजीत माझा नेहमी
उपयोग होतो खास
माझा बनवलेला ठेचा
झणझणीत झकास


आधी असते हिरवी
नंतर होते लाल
जपून खा मला
नाही तर होतील हाल


जहाल म्हणूनच मला
ओळखतो सारा गाव
मिठासोबत माझेच
अहो, घेतात सारे नाव



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कच्च्याची लागते
आंबट फोड
पिकल्यावर होतो
मधुर गोड


रस याचा पिऊन
एकदा तरी पाहा
फळांचा राजा
कोण बरं हा?


२) पाय याचे बारीक
डोक्यावर तुरा
पावसाला झेलून
तो फुलवी पिसारा


नाच त्याचा पाहून
रान सारे डोले
म्याओ म्याओ करून
कोण बरं बोले?


३) गरगर फिरून
दमत कसे नाही
स्वतःसोबत इतरांना
पळवत राही


तीन चमचे बारा वाट्या
त्याच्याकडे असे
वेळेचा हिशोब
कोण सांगताना दिसे?



उत्तर -


१)आंबा


२) मोर


३) घड्याळ

Comments
Add Comment

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला

उपयुक्तता व सौंदर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर आजच्या जगात आपल्याला काय आढळते. माणसे ही सौंदर्याच्या मागे लागलेली

स्व-जाणीव

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जोमनुष्य स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्याला जीवनात सर्व काही

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात

हत्ती

कथा : रमेश तांबे एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती