मिरचीपुराण : कविता आणि काव्यकोडी

वावरातून आले थेट
मी घरची ना दारची
मी लवंगी मिरची
आहे कोल्हापूरची


घरच्या घरी वाळवून
कुटून ठेवतात मला
तिखट हवं तेव्हा
मग येते मी कामाला


खात्री देत नाही मी
विकतच्या मसाल्याची
पोट बिघडलं तुमचं की
बोलणी आम्ही खायची


भाजीत माझा नेहमी
उपयोग होतो खास
माझा बनवलेला ठेचा
झणझणीत झकास


आधी असते हिरवी
नंतर होते लाल
जपून खा मला
नाही तर होतील हाल


जहाल म्हणूनच मला
ओळखतो सारा गाव
मिठासोबत माझेच
अहो, घेतात सारे नाव



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कच्च्याची लागते
आंबट फोड
पिकल्यावर होतो
मधुर गोड


रस याचा पिऊन
एकदा तरी पाहा
फळांचा राजा
कोण बरं हा?


२) पाय याचे बारीक
डोक्यावर तुरा
पावसाला झेलून
तो फुलवी पिसारा


नाच त्याचा पाहून
रान सारे डोले
म्याओ म्याओ करून
कोण बरं बोले?


३) गरगर फिरून
दमत कसे नाही
स्वतःसोबत इतरांना
पळवत राही


तीन चमचे बारा वाट्या
त्याच्याकडे असे
वेळेचा हिशोब
कोण सांगताना दिसे?



उत्तर -


१)आंबा


२) मोर


३) घड्याळ

Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता