Badrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच मृत्यू

बसमधून १७ जण करत होते प्रवास


डेहराडून : उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथच्या (Badrinath accident) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेऊन जात असलेल्या मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने बस अलकनंदा नदीत (Alaknanda river) कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये १७ प्रवासी होते, अशी माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली. नोएडातून हे भाविक बद्रीनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. श्रीनगर येथून बद्रीनाथ महामार्गावरुन जात असताना रुद्रप्रयाग येथे हा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेक्स्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने महत्प्रयासाने या अपघातग्रस्त वाहनातून भाविकांची सुटका केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.





उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या भीषण अपघाताचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. "रुद्रप्रयाग येथीस घटना अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत", असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.




Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे