Badrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच मृत्यू

बसमधून १७ जण करत होते प्रवास


डेहराडून : उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथच्या (Badrinath accident) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेऊन जात असलेल्या मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने बस अलकनंदा नदीत (Alaknanda river) कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये १७ प्रवासी होते, अशी माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली. नोएडातून हे भाविक बद्रीनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. श्रीनगर येथून बद्रीनाथ महामार्गावरुन जात असताना रुद्रप्रयाग येथे हा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेक्स्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने महत्प्रयासाने या अपघातग्रस्त वाहनातून भाविकांची सुटका केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.





उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या भीषण अपघाताचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. "रुद्रप्रयाग येथीस घटना अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत", असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.




Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून