Shinde vs Thackeray : ठाण्याची जागा गेल्याने उबाठाला मोठं भगदाड! माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

  83

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जास्त जागा मिळाल्या तर महायुतीला (Mahayuti) तुलनेने कमी जागा मिळाल्या. असं असलं तरी ठाकरे गटातून (Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कमी व्हायचे नाव घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात (Thane) उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उमेदवाराचा सहज पराभव झाला. या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.


दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाण्यामधून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश पार पडल्यामुळे तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरत यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी नेते यावेळी उपस्थित होते. मीरा भाईंदर शहरात आणखी दोन माजी नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक विश्वासू शिलेदार ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती