Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम! विद्यार्थिनींची थेट न्यायालयात धाव

  104

जाणून घ्या नेमके प्रकरण काय


मुंबई : चेंबूर येथील महाविद्यालयाने प्लेसमेंटची वाढ आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हिजाब आणि बुरखाबंदी (Hijab Ban) करण्यात आली आहे. विद्यार्थी बुरख्यात नोकरी शोधायला गेले तर त्यांचा विचार केला जाईल का? समाजात कसे राहायचे आणि कसे वागायचे याबाबतचे मूल्य आणि शिष्टाचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, यासाठी हिजाब बंदीचा निर्णय घेतला असल्याचे आचार्य कॉलजने स्पष्ट केले होते. मात्र याप्रकरणाबाबत विद्यार्थिनींनी थेट मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या निर्णयाविरोधात नऊ विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात (NG Acharya and DK Marathe College) हिजाब, नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आली होती. या निर्णयाला घेऊन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कॉलेजच्या चौकटीत झालेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठांसमोर वकील अल्ताफ खान यांनी याचिका सादर केली. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.


दरम्यान, आजपासून २०२४-२५ शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या निर्बंधामुळे आपल्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल, याची भीती विद्यार्थिनींना वाटत आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.