Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम! विद्यार्थिनींची थेट न्यायालयात धाव

जाणून घ्या नेमके प्रकरण काय


मुंबई : चेंबूर येथील महाविद्यालयाने प्लेसमेंटची वाढ आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हिजाब आणि बुरखाबंदी (Hijab Ban) करण्यात आली आहे. विद्यार्थी बुरख्यात नोकरी शोधायला गेले तर त्यांचा विचार केला जाईल का? समाजात कसे राहायचे आणि कसे वागायचे याबाबतचे मूल्य आणि शिष्टाचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, यासाठी हिजाब बंदीचा निर्णय घेतला असल्याचे आचार्य कॉलजने स्पष्ट केले होते. मात्र याप्रकरणाबाबत विद्यार्थिनींनी थेट मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या निर्णयाविरोधात नऊ विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात (NG Acharya and DK Marathe College) हिजाब, नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आली होती. या निर्णयाला घेऊन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कॉलेजच्या चौकटीत झालेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठांसमोर वकील अल्ताफ खान यांनी याचिका सादर केली. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.


दरम्यान, आजपासून २०२४-२५ शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या निर्बंधामुळे आपल्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल, याची भीती विद्यार्थिनींना वाटत आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या