WI vs NZ: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर धमाकेदार विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) २६व्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर धमाकेदार १३ धावांनी विजय मिळवला आहे. शेरफन रूदरफोर्डच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंड्च्या संघाला याचा पाठलाग करताना ९ बाद १३६ इतक्या धावा करता आल्या.


न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने ४० धावा करत सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याला इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने न्यूझीलंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले.


याआधी पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची अवस्था एकेकाळी ५८ धावांत ६ बळी गमावले होते. मात्र हळू हळू त्यांनी डाव सावरला. रुदरफोर्डने एक बाजू लावून धरली आणि संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. पहिल्या टप्प्यातील तसेच मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर रुदरफोर्डने खालच्या फळीतील फलंदाजांना साथीला घेत वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.


दुसरीकडे न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनंतर मिचेल सँटनरने न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र या आशा फोल ठरल्या आणि वेस्ट इंडिजचा १३ धावांनी विजय झाला.


Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.