तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Share

तळीयेवर दरडीची टांगती तलवार कायम; २७१ पैकी केवळ ६६ कुटूंबांचे पुनर्वसन

महाड : महाड तालुक्यातील तळीये गावातील कुटूंब आजही दरडींच्या छायेखाली वावरत आहेत. म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेले पुनर्वसनाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून तीन वर्षात २७१ पैकी केवळ ६६ घरांचा ताबा देण्यात आला आहे. तर तळींये गावच्या उर्वरीत सर्व वाड्यांचे पुर्नवसन आजही बाकी असून हे दरडग्रस्त ग्रामस्थ आजही दरडींच्या छायेत गावातील घरात रहात आहेत. आपले पुनर्वसन केंव्हा होणार, असा प्रश्न तळीये ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महाड तालुक्यातील तळीये गावावर २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत गावातील ८७ जणांचा बळी गेला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. यानंतर गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घेतली होती. म्हाडाच्या माध्यमातून संपुर्ण गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी भूसंपादन करून सुरूवातीला घरांचे काम वेगात सुरू झाले. नंतर मात्र हे काम मंदावले. झालेल्या कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी अनेकदा शंका उपस्थित केल्या.

तळीयेच्या सात वाड्यांमधील २७१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता परंतु आज तीन वर्षात रडतखडत केवळ ६६ कुटुंबांना निवारा मिळाला आहे. लोणेरे येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या घरांच्या चाव्या दरडग्रस्त कुटुंबाना सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरीत कुटुंबांपैकी काही कुटुंब कंटेनर शेडमध्ये तर बरीचशी कुटुंबे अद्यापही गावातच आपल्या जुन्या घरात रहात आहेत. सध्या दुसऱ्या टप्यातील घरांची कामे सुरू आहेत. मात्र हे काम कासवगतीने सुरू आहे. तळीये गावच्या सातही वाड्यांसाठी २०० हून अधिक घरे उभी करायची असली तरी तेथे कामगारांचा राबता दिसत नाही. मोजक्याच कामगारांच्या मदतीने हे काम केले जात आहे. हे काम असेच सुरू राहिले तर पुढील दोन वर्षात तरी ही घरे पूर्ण होतील का अशी शंका दरडग्रस्त कुटुंबे व्यक्त करीत आहेत. ज्या ६६ दरडग्रस्तांना घरांचा ताबा दिला आहे त्या घरांचा दर्जा किती चांगला आहे हे यावर्षी च्या पावसाळ्यात स्पष्ट होईल

तीन वर्षांनंतर देखील पुनर्वसन अपुर्णच

तळीये गावला सात वाड्या आहेत. कोंडाळकर वाडीवर दरड कोसळल्यानंतर शासनाने भुगर्भ शास्त्रज्ञांमार्फत संपूर्ण तळीये गावचा सर्वे करून घेतला. या सर्वे नुसार संपूर्ण तळीये गावाला म्हणजे तळीये गावच्या सातही वाड्यांना दरडीचा धोका असल्याचे सांगण्यात आले. त्या नुसार शासनाने तळीये गावच्या दरडीखाली गाडल्या गेलेल्या कोंडाळकर वाडी सह बौध्दवाडी, चर्मकारवाडी, शिंदेवाडी, कुंभेनळी, खालचीवाडी आणि मधली वाडी या सातही वाड्यावरील २७१ कुटूंबांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला. दरड दुर्घटनेनंतर आज तीन वर्षात केवळ कोंडाळकर वाडीच्या पुनर्वसनासाठी घर बांधुन झाली आहेत तर तळीये गावच्या उर्वरीत सहा वाड्यांवरील २०५ कुटूंब आजही दरडींच्या भितीने डोंगराच्या कुशीत रहात आहेत.

Recent Posts

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

14 minutes ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

18 minutes ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

26 minutes ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

1 hour ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

1 hour ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

2 hours ago