पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. तर डॉ. पीके मिश्रा यांना पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान म्हटले जाणारे अजित डोवाल १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी प्रमुख असलेले डोवाल ३१ मे २०२४ला पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले होते.


खरंतर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतात. यांचे प्रमुख काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे असते. एनएसएचे हे पद पहिल्यांदा १९९८मध्ये बनवण्यात आले होते जेव्हा देशात दुसऱ्यांदा आण्विक चाचणी करण्यात आली होती. सरकारमध्ये हे पद खूप महत्त्वाचे असते.


मग ते ३७० असो, सर्जिकल स्ट्राईक असो, डोकलाम असो वा राजकीय निर्णय डोवाल हे देशांच्या आशांवर नेहमीच खरे उतरले आहेत. पुलवामाचा बदला तर पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हा निर्णय डोवाल यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता.


डोवाल १९७२मध्ये इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सामील झाले होते. आपल्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ ७ वर्षे पोलीसांची वर्दी घातली कारण डोवाल बराचवेळ देशाच्या गुप्तहेर विभागात काम करत होते. यामुळेच त्यांचे करिअरही तितकेच अनोखे होते.

Comments
Add Comment

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न