राज्यातील प्रत्येक होर्डिंगचे मंत्रालयातून होणार मॉनिटरिंग

Share

राज्य सरकारकडून घ्यावी लागणार होर्डिंगची परवानगी

मुंबईत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्यातील प्रत्येक होर्डिंगचे मॉनिटरिंग मंत्रालयातून होणार आहे. एवढेच नाही तर होर्डिंगसंदर्भातले निकष राज्य सरकार ठरवणार आहे. होर्डिंगची परवानगी राज्य सरकारकडून घ्यावी लागणार आहे. घाटकोपर होर्डिंग प्रकरणानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. तसेच दिलेल्या निकषाचे पालन हे संबधित संस्था किंवा कंपनी यांच्याकडून योग्य पालन होत आहे का? याचाही आढावा घेतला जाणार आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात लागणारे होर्डिंग हे एमएमआरडीए, एमएसआरडीसी, किंवा रेल्वेच्या हद्दीत जरी असले तरी त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडून घेणे गरजेचे राहणार आहे. संबंधित होर्डिंग लावण्याबाबतचे निकष हे राज्य सरकारकडून ठरवले जाणार आहे. दिलेल्या निकषाचे पालन हे संबधित संस्था किंवा कंपनी यांच्याकडून योग्य पालन होत आहे का ? याचाही आढावा घेतला जाणार आहे. लवकरच याबाबत राज्य सरकारकडून अधिकृतरित्या घोषणा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

घाटकोपर दुर्घटनेच्या महिन्याभरानंतर होर्डिंगबाबत पालिका प्रशासनाला जाग आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने साल २०१७ मध्ये दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. तसेच मुंबईतील सर्व होर्डिंगची वॉर्डनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश देखील झाले आहेत. होर्डिंगबाबतचा परवाना, आकारमान, डिजिटल होर्डिंग चालू ठेवण्याची वेळ मर्यादा या गोष्टी तपासल्या जाणार आहे. डिजीटल होर्डिंग रात्री ११ पर्यंतच चालू ठेवण्याची मुभा आहे. प्रत्येक होर्डिंगवर माहिती देणारा क्यू आर कोड लावणे कंपनीला बंधनकारक आहे.

मुंबईत कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तूर्तास परवानगी नाही, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. नागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देवून त्याचबरोबर शहराला बकालपणा येणार नाही, अशा रितीनेच यापुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

10 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

11 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

11 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

12 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

13 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

13 hours ago