सांगली : मिरजेतील भूपाल माळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. घटना घडून सात वर्ष झाली तरी भूपाल माळी यांच्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. सदर घटना सात वर्षापूर्वी घडली असून या घटनेतील कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी माळी कुटुंबाची कोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्नी शोभा माळी यांनी शासनाकडे केली होती. या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून काही लोकप्रतिनिधींनी याबाबत मंत्रालयात पाठपुरावा देखील सुरू केला आहे आणि लवकरच सदर घटनेत ॲड संजीव देशपांडे यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
संपूर्ण प्रकरण असे आहे की, मिरजेतील वैरण बाजार परिसरातील घरकुलाच्या वादातून जमादार बंधूंनी माळी कुटुंबाला घराबाहर काढले. त्यानंतर माळी यांनी याबाबत पोलिसांसह प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी देखील दिल्या. मात्र काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर माळी यांनी दि. २३ जून २०१६ रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वीं त्यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. या चिट्ठीतील मजकुरावरून मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊनही या प्रकरणात अटकेची कारवाई झाली नाही.
सध्या मुंबईं उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. माळी कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि पतीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईं व्हावी यासाठी उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ॲड संजीव देशपांडे यांची नियुक्ती होणार आहे आणि याबाबत शासनास पत्रव्यवहार देखील झाला आहे. त्यामुळे लवकरच माळी कुटुंबाला न्याय मिळेल, अशी सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…